दत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story  From Datta Purana
दत्त पुराणातील उद्बोधक कथा-Story  From Datta Puran

दत्त पुराणातील उद्बोधक कथा:Story  From Datta Purana

दत्त पुराणातील उद्बोधक कथा

विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता.

त्याच्या घरासमोर एक अश्वत्थ (पिंपळ) होता आणि रोज माध्यान्हकाळी वैश्वदेव केल्यानंतर त्या अश्वत्थाच्या मुळाशी भूतबळी  ठेवायची विष्णुदत्ताची पद्धत होती.

त्या झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि विष्णुदत्ताने ठेवलेला भुतबळी भक्षण करून तो संतुष्ट होत असे.

एके दिवशी विष्णुदत्त ब्राह्मण भुतबळी ठेवण्यासाठी आलेला असताना तो ब्रह्मराक्षस तिथे प्रकट झाला.

त्याचे विक्राळ रूप पाहून विष्णुदत्ताने दत्त महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली. विष्णुदत्त भ्याला आहे असे जाणून ब्रह्मराक्षस म्हणाला भिऊ नकोस .

रोज तू ठेवीत असलेले बळी अन्न खाऊन मी संतुष्ट झालो आहे तेव्हा जे मनात असेल ते मागावे.

विष्णुदत्त मनात विचार करू लागला हा वर देण्यास सिद्ध झाला आहे खरा पण काय मागावे? घरदार कि संपत्ती, अजून मुलबाळ नाही म्हणजे संतती कि अन्य काही.

मनात बराच विचार करून काही नक्की न झाल्याने आत जाऊन पत्नीला सर्व वृत्त कथन केले आणि म्हणाला काय मागावे? ती अतिशय हुशार होती, म्हणाली प्राणेश्वरा, 

मागू नका नश्वरा l श्री दत्ताची भेटी करा l ऐशा वरा मागावे l

एकदा का दत्तात्रेयांची भेट झाली कि सर्व संपदा आपोआप मागे येतील.

हेच योग्य आहे असे ठरवून विष्णुदत्त बाहेर येऊन म्हणाला कि मला काही द्यावयाची इच्छा असेल तर दत्त भेट घडवून द्यावी.

यावर तो ब्रह्मराक्षस म्हणाला कि वास्तविक त्याचे नाव सुद्धा आमचा थरकाप उडवते पण मी कबुल केले आहे तेव्हा भेट घडवून देईन. 

एकदा एक मद्याच्या दुकानात एक अत्यंत गलिच्छ असा मनुष्य आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, ब्राह्मणा तुझे दैवत त्या मद्याच्या दुकानात आहे तेव्हा त्वरा करावीस.

Amazon Brand – Solimo Microfiber Reversible Comforter, Single (Aqua Blue & Olive Green, 200 GSM)

विष्णुदत्त ब्राह्मण घाईघाईने तिथे गेला खरा पण त्या मनुष्याला पाहून त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला हे दुर्गंधी येणारे आणि मलिन अवस्थेतील दत्तात्रेय कसे असतील? 

आधीच जातीचा भूत l त्यास काय ठावा दत्त l लोक हासतील  निश्चित l पाय धरिता मद्यप्याचे ll 

असा विचार मनात येताच तो मनुष्य गुप्त झाला. तो गुप्त होताच मात्र विष्णुगुप्ताला पश्चात्ताप झाला. आता घरी जाताच पत्नी काय म्हणेल हा विचार करीत करीत तो घरी आला.

परत घरी येताच त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताची चांगली हजेरी घेतली आणि म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव. 

काही दिवसांनी एकदा स्मशानात दत्त महाराज कावळ्या-कुत्र्यांबरोबर खेळत होते ते जाणून, त्या ब्रह्मराक्षसाने विष्णुदत्ताला हाक मारली आणि म्हणाला, शीघ्र जाऊन पाय धरावेत, या वेळी विष्णुदत्त ब्राह्मण स्मशानात पोहोचताच दत्त महाराजानी त्याच्यावर मोठी हाडे फेकून मारण्यास सुरुवात केली, त्या माराच्या भयाने विष्णुदत्त पळाला आणि घरी आला.

ब्रह्मराक्षस घरी विष्णुदत्त येताच त्याला म्हणाला ह्या देहाला भुलून तू पळ काढलास, अरे ह्या नाशिवंत देहाची काय म्हणून ममता घ्यावीस आता यापुढे शेवटचा प्रयत्न मी करेन अन्यथा तुझ्या नशिबी दत्त दर्शन नाही असे समजावे.

पुन्हा एकदा स्मशानात दत्त महाराज आलेले पाहून ब्रह्मराक्षस विष्णुदत्ताला हाक मारून म्हणाला, विप्रा ह्या वेळी मात्र धीर धरून त्या परमात्म्याचे पाय धरावेत.

आणि जर त्यांनी काय हवे आहे असे विचारल्यास दर्शश्राद्धाला आपण ब्राह्मण म्हणून यावे असे आमंत्रण द्यावे.

विष्णुदत्त स्मशानात जाऊन पाहतो ते खरोखर तसाच एक मनुष्य बसून काही खाद्य कावळ्या-कुत्र्यांना  वाटून देत होता, त्वरेने विष्णुदत्ताने धाव घेतली आणि प्रतिकार वा माराला न जुमानता पाय धरले.

तो मनुष्य म्हणाला अरे माझे पाय काय धरतोस मी धर्माधर्म विवर्जित आहे.

विष्णुदत्त हसून म्हणाला, तू परमात्मा आहेस तुला कसला धर्म वा अधर्म!

तेव्हा दत्त महाराज हसले आणि त्यांनी आपले स्वरूप दाखविले.

तात्काळ तिथे स्मशानाऐवजी योगभूमी दिसू लागली, कुत्रे वेदरूपात प्रकट झाले आणि ते कावळे म्हणजे सर्व शास्त्रे होती.

दत्त महाराजांनी विचारताच विष्णुदत्त ब्राह्मणाने त्यांना श्राद्धाचे निमंत्रण दिले मात्र दत्त महाराजांनी एक अट घातली, जर पंक्तियोग्य ब्राह्मण असतील तरच मी भोजन करेन, यावर तसे ब्राह्मण येतील असे म्हणून विष्णुदत्त घरी आला.

झालेला सर्व प्रकार त्याने ब्रह्मराक्षस आणि आपल्या पत्नीस सांगितला.

ती अत्यंत आनंदित होऊन स्वयंपाकास लागली.

ब्रह्मराक्षस म्हणाला, तुझा कार्यभाग जरी झाला असला तरी माझे अगत्याने स्मरण ठेव.

माध्यान्हकाळी दत्तमहाराज आले, त्यांचे स्वरूप पाहून विष्णुदत्ताचे भान हरपून गेले, त्याची अवस्था पाहून पत्नी पुढे झाली आणि तिने त्यांना आसन दिले.

दत्त महाराज म्हणाले, दर्श श्राद्ध आहे तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत.

विष्णुदत्त लगेच बाहेर येऊन त्या ब्रह्मराक्षसाला विचारू लागला आता कोणाला बोलवावे?

यावर ब्रह्मराक्षस उत्तरला, अरे ब्राह्मणा अग्नी आणि आदित्य हे दोघे यासाठी योग्य आहेत.

तेव्हा विष्णुदत्ताच्या पत्नीने दोघांना आमंत्रित केले.

हे अग्नी देवा अत्रिसुत वाट पाहत आहेत तेव्हा भोजनास सत्वर यावे, त्याचबरोबर बाहेर येऊन सूर्याला वंदन करून ती म्हणाली, हे कश्यप नंदना दत्तात्रेय वाट पाहात आहेत तेव्हा भोजनास यावे.

सत्वर दोघेही देव ब्राह्मण वेशात आले आणि पंगतीस बसले.

तिघा देवांना आग्रहाने वाढायचा योग विष्णुदत्ताच्या प्रारब्धात होता, धन्य तो विष्णुदत्त आणि त्याची पत्नी!

दत्त महाराजांचे उच्छिष्ट हे त्या ब्रह्मराक्षसाला दिल्यावर तो देखील मुक्तीस गेला.

Amazon Brand – Solimo Plastic 500 ml Large Vegetable Chopper with 3 Blades, Blue

Leave a Reply