सोमनाथ     गुजरात राज्यातील प्रभापटनम येथे हे मंदिर आहे.  प्रभा पटनम हे ठिकाण गुजरात मधील वेरावळ जिल्ह्यामध्ये येते.  बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आहे.  प्राचीन ग्रंथानुसार सोम राजा अर्थात चंद्राने आपल्यावर असलेल्या शापाचे निराकरण याठिकाणी केले. सोम राजा भगवान शंकराच्या  आशीर्वादाने शापातून मुक्त झाला.  म्हणून या ठिकाणाला सोमनाथ हे नाव पडले अशी अख्यायिका आहे.

मल्लिकार्जुन  रागावून गेलेल्या कार्तिक यास भेटण्यासाठी मल्लिका म्हणजेच माता पार्वती व अर्जून म्हणजेच भगवान शंकर सोबत आले म्हणून या ठिकाणास मल्लिकार्जुन असे म्हणतात. श्रीशैल्यम पर्वतावर ती हे ठिकाण आहे. दक्षिणेचा कैलास म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

महाकालेश्वर     महेश म्हणजेच भगवान शंकराच्या मनामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांची परीक्षा द्यावी असे आले.  भगवान शंकराने ब्रह्मा आणि विष्णू यांना प्रकाशाचा अंत शोधण्यास सांगितले.  यामध्ये आली विष्णू निहार मांडली तर ब्रम्हा यांनी खोटे उत्तर दिले.  म्हणून या ठिकाणी शिवशंभुने महाकाल रूप धारण केले.  यावरून याला महाकालेश्वर असे म्हटले जाते.

ओंकारेश्वर    उज्जैन पासून जवळच नर्मदेच्या काठावर हे मंदिर आहे.  हा सर्व मंदिराचा भाग ओंकाराच्या आकाराचा असल्याने यास ओंकारेश्वर असे म्हटले जाते.

केदारेश्वर    केदारेश्वर म्हणजेच केदारनाथ हे ठिकाण हिमालयाच्या गडवाल रांगेमध्ये वसलेले एक ठिकाण आहे. उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यांमध्ये हे ठिकाण आहे. कार्तिक महिन्यापासून चैत्र महिन्यापर्यंत हे मंदिर बर्फाच्छादित असते.

भीमाशंकर    कुंभकर्णाचा मुलगा भीम आणि भोलेनाथ यांच्यामध्ये या ठिकाणी युद्ध झाले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले.पुण्यापासून तुलनात्मक दृष्टीने जवळच  असणारे हे ठिकाण आहे. सुमारे तेराशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे.

विश्वेश्वर   बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पवित्र असे हे ज्योतिर्लिंग म्हणता येईल. कैलास पर्वतावर भस्म लावून राहणाऱ्या भगवान शंकरांची टिंगल सर्वांनीच केली तेव्हा माता पार्वतीने शिवशंभु ना विनंती केली की मला येथून कुठेतरी दूर घेऊन चला.  तेव्हा भगवान शंकर काशी म्हणजेच वाराणसी  या ठिकाणी येऊन राहू लागले.

त्र्यंबकेश्वर    त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून जवळच ब्रम्हगिरी पर्वतावरती आहे.  याच ठिकाणी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा येथे प्रकट झाली व भगवान शंकर लिंग रूपाने अवतरले अशी आख्यायिका आहे.

वैद्यनाथ    वैद्यनाथ म्हणजेच परळीचा वैजनाथ होय. हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी कुष्ट रोगापासून बरे होण्यासाठी अनेक रोगी येतात असे मानले जाते.

नागनाथ     महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा मध्ये असणारे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे.  या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला नागेश्वर असेदेखील म्हटले जाते.

रामेश्वर     प्रभू श्रीरामाने लंकेत जाण्यापूर्वी स्वतः शिवलिंगाची स्थापना याठिकाणी केल्यामुळे या ठिकाणाला रामेश्वर असे म्हटले जाते.

घृष्णेश्वर   महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये  वेरूळ लेण्या जवळ हे मंदिर आहे.  येथे शिव कुंड नावाचे सरोवर देखील आहे.  हिंदू धर्माचा आख्यायिकेनुसार घृष्णे च्या विनंतीवरून भगवान शंकर येथे तिथे झाले म्हणून या ठिकाणाला घृष्णेश्वर असे म्हणतात.

Fill in some text