पाटणा देवी मंदिर,जळगाव:Patna Devi Mandir,Jalgaon
Patna Devi Mandir पाटणा देवी मंदिर

पाटणा देवी मंदिर,जळगाव:Patna Devi Mandir,Jalgaon

पाटणा देवी मंदिर

पाटणा देवी मंदिर(चंडिका देवी मंदिर)हे महाराष्ट्रातील जळगाव शहरातील चाळीसगावपासून दक्षिण-पश्चिमेस 18 कि.मी. अंतरावर असलेले ऐतिहासिक व पर्यटनस्थळ आहे.

हे स्थान गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या आत आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतांनी वेढलेले आहे.

येथे चंडिका देवी मंदिर आणि हेमाडपंथी महादेव मंदिर आहे.

वर्ष 1150 मध्ये यादवराव खेऊंचंद्र आणि गोविंदराज मौर्य यांनी मंदिर बांधले होते.

पूर्वीच्या काळात ही पटना (विजलगड) या महत्वाच्या प्रांताची राजधानी होती. यादव राजा आणि त्यांच्या सहायकांच्या राज्यात पूर्वीच्या राजाने राज्य केले.

भास्कराचार्य हे 12 व्या शतकातील भारतीय गणितज्ञ होते . ते त्या काळी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञही होते.

ते पाटणादेवीच्या आश्रमात राहत होते. असे म्हणतात की त्यांनी पाटणादेवी येथे प्रसिद्ध “सिद्धांत शिरोमणि” हे लिहिले होते.

आज असलेले चंडिका ( पाटणा) देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. ह्या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे.

ह्या शक्तिपीठा संदर्भात कथा अशी आहे की, सतीचे वडील दक्षप्रजापती त्यांनी एकदा पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परंतु शिव – सतीस यज्ञाचे निमंत्रण दिले नाही.

कारण शिव-सतीचा विवाह वडील दक्षप्रजापती यांचे मनाविरुध्द झाला,ह्या विवाहास त्यांची संमती नव्ह्ती.

हे एक यज्ञास न बोलविण्याचे मुख्य कारण तसेच शिवजीचे सर्वभक्तगण स्मशाणात राहणारे , चित्रविचित्र पोषाख
करणारे, कफल्लक, अंगास भस्म फासणारे …

त्यामुळे ह्या यज्ञ सोहळ्यात ह्या सर्वांचे प्रयोजन नाही असे कारण दाखवून दक्षप्रजापतीने शिव-सतीस निमंत्रण दिले नाही.

भव्य अशा यज्ञ मंडपात यज्ञाची सुरुवात झाली. सर्व देव आपाआपला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारदमूनी सतीस जावून भेटले.

आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऎकवीले व विचारले की आपण अजून का गेला नाहीत.

त्यावर सतीने “आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले” त्यावर पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाणी दर्शनासाठी कुठ्ल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तीवादाने सतीस पटवून दिले.

यज्ञाचे निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील. अशी इच्छा सतीने शिवजीस सांगितली. ही वेळ योग्य नाही ही गोष्ट शिवजींनी सतीस समजावीण्याचा प्रयत्न केला.

परंतु श्रीहट्टापुढे तो जमला नाही. म्हणून त्यांनी सतीस एकटीने जाण्यास परवानगी दिली.

सती नंदीसोबत यज्ञाचे दर्शनासाठी सर्व प्रथम पितॄगॄही गेली. त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तगणगोतांनी विनानिमंत्रण तू का आलीस असे हिनवून सतीचा अपमान केला.

वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला. सती पुढे यज्ञमंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतेंचे भाग यज्ञपीठावर मांड्लेले सतीने पाहिले.

परंतु महादेवाचा भाग त्या ठिकाणी नव्हता असा शिवजीचा अपमान योग्य नाही हे समजाविण्याचे प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धूंध झालेल्या दक्षप्रजापतीस सतीचे म्हणणे पटले नाही.

उलट शिवजी तुझे पती आहे त्यामुळे हे तु बोलतेस व त्याने सतीस तू यज्ञमंड्पातून चालती हो असे सांगितले त्यामुळे देवधीदेव महादेवासह आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर हे य़ज्ञ मंड्पातच संपविण्याचा निश्चय केला.

तिने आत्मशक्ती जागृत करुन शरीरातुन प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ही गोष्ट शिवजीस नंदीने जावून सांगितली.

शिवजी खूप क्रोधीत झाले त्यांनी आपल्या जटा आपटून विरभद्र निर्माण केला व दक्षयज्ञाचा विद्ध्वंस केला व सतीचे शव दोन्ही हातात घेवून कैलासाकडे जावयास निघाले परंतु पत्नी वियोगाचे क्रोधामुळे तांडव नृत्य करु लागले.

त्यातच त्यांचा तिसरा नेञ उघडला गेला व जो समोर येइल तो भस्म होवू लागला. अश्या ह्या संहारामुळे सर्वांचा विनाश होइल अशी काळजी सर्व देवांना पडली.

त्यावळी सर्व देव भगवान विष्णुकडे शरण गेले ह्यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली, त्यावेळी भगवान विष्णुंनी क्रोधाचे कारण असलेले शिवजीच्या हातातील सतीचे शव नष्ट करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही हे लक्षात घेवुन आपल्या सुदर्शन चक्राने शिवजीच्या हातातील शवाचे तुकडे केले.

ज्या ज्या ठिकाणी त्या शवाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले.

मंदिरा मागील डोंगरावर भगवतीसतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्यामुळे त्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाले.

शक्तिपीठाची मुळ जागा डोंगराच्या उंच कडेवर आहे.

भगवतीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली. वृध्दापकाळाने गात्र शिथील होवु लागले. त्यामुळे उपासनेत खंड पडेल ह्या विचाराने ते चिंतीत झाले.

त्यावेळी एक अनुष्ठान त्यांनी केले त्यावेळी भगवतीने त्यांचेवर प्रसन्न होवून दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले.

त्यावेळी त्यांनी भक्तांसाठी व स्वतःकरीत असलेल्या नित्य उपासनेसाठी भगवतीने उंच कडेवरुन खाली यावे अशी विनंती केली. आपल्या परमप्रिय भक्तासाठी ही विनंती मान्य केली.

मी तुझ्या भक्तिपोटी तुझ्याबरोबर खाली येइल पण मी मागे येत असताना तु मागे वळून पाहू नये असे सांगितले त्याप्रमाणे भगवती आपल्या परमप्रिय भक्तामागे येवु लागली.

डोंगरकडा उतरुन आल्यावर गोविंदस्वामी धवलतिर्थ कुंडाजवळ येवून पोहचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करुन आपली त्रुषा शांत केली.

पुढील मार्गक्रमणास सुरुवात करते वेळी त्यांना भोवळ आली व त्यातुन सावरताच त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऎकु आला.

त्यामुळे ते भांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरुन त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदॄश्य झाली.

घडल्या प्रकाराचे त्यांना खूप वाइट वाटले. पण ते दॄढ निश्चयाने ते त्या ठिकाणी मरणांत अनुष्ठानास बसले शेवटी भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही.

तर तुला दिलेल्या वचन पुर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर, स्नान करतेवेळी तुझ्या हातात स्वयंभू मुर्ती येइल ती तू घे व माझी स्थापना कर.

अश्या रितीने स्नानानंतर गोविंद स्वामीच्या हातामध्ये पाषाणाची स्वयंभू मुर्ती आली.

पाटणा देवी (चंडिका देवी )

त्याच मुर्तीची स्थापना गोविंद स्वामींनी आजच्या चंडिकादेवी मंदिरात त्यावेळी केली.

ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे.

तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचन पुर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी आज मंदिराचे पुढे आहे.

आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे.

भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते.

भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाटत नाही काही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.

अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातून भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदळा नेतात.

Leave a Reply