श्री गुरु प्रतिपदा : Shri Guru Pratipada
श्री गुरु प्रतिपदा : Shri Guru Pratipada

श्री गुरु प्रतिपदा : Shri Guru Pratipada

गुरु प्रतिपदा 

गुरु प्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा)  श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज निजनांदगमन दिवस!

(माघ वद्य प्रतिपदा)गुरु प्रतिपदा हा महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार माघी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, माघ महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारी) पौर्णिमेचा दिवस पाळला जाणारा एक शुभ दिवस आहे.

माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला अतीव प्रेमादराने “श्रीगुरुप्रतिपदा” असे संबोधले जाते.

त्याचे कारणही तसेच आहे.

द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे.

गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.

बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।।

शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।। 

मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।। 
त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।।

आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।। 
श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५

याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. 

आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून शैल्यगमन केले होते.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन

म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

येथे यति पूजन होते.

येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात.

भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या ‘विमल पादुका’ स्थापन करून वाडीला गमन केले होते.

ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या.

तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या ‘मनोहर पादुका’ स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले.

गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले.

त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी.

यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषाना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले.

आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते.

नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।

Leave a Reply